बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ . सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या .

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केलं जात आहे. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने‌ आपल्या कर्तव्यात व‌ तपासात दिरंगाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. तसेच पोलीस दल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली होती. त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती केली होती.

.
बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ . सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या .
बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ झाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत

या बदल्यांमध्ये केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तर पोलिस निरीक्षक वैभव पाटील हे आता केज पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलिस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार घेणार आहेत, आणि पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.